अनेक विकारांमुळें चंचल होऊन, करीत असलेल्या धर्मकृत्यांतून पुन्हां स्थानभ्रष्ट होणाऱ्या मनाला, विवेकानें आवरून, वरचेवर मार्गी लावण्याचा, वळविण्याचा, स्थिर करण्याचा, प्रयत्न करावा लागतो. या पुन्हां पुन्हां करण्याचा कंटाळा बाळगून चालत नाहीं. मनाला वळविण्याचा त्यापेक्षां दुसरा मार्गहि नाहीं.