राग यावा असें दुसरे वागतात असें जें वाटते त्यामागे तसें वागणाराच्या दृष्टीनेहि कांही योग्य कारणें असूं शकतात तीं विचारांत घेतली गेली पाहिजेत. आपणाला आवडत नाहीं, पटत नाहीं असें जें वाटतें, तेहि योग्यच असतें असें नाहीं. आपल्या स्वभावामुळे रजोगुणाच्या, तमोगुणाच्या, प्राबल्यामुळे आपली आवड हीच मुळांत अनिष्ट असण्याची शक्यता आहे हेहि विचारात घेतले गेलें पाहिजे.
COPYRIGHT © 2024 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित