ऊभा कैवल्याचा गाभा – गायक श्री पद्मनाभ आठवले

श्रीहरि स्तोत्र (नंदनंदन नंदनंदन नंदनंदन धाव रे)

1)धर्म म्हणजे काय ? धर्माचे अंतिम लक्ष्य किंवा साध्य कोणते ?

2)“ आहारनिद्राभयमैथुनं च ” या श्लोकातील अर्थाप्रमाणे धर्म हाच मनुष्यत्वाचा विशेष या विना ते पशुत्व, याचे स्पष्टीकरण काय ?

3)धर्म म्हणजे संध्या – पुजा – जानवे – शेंडी – जपजाप्य – दान – व्रते – उपवास – मंदिरात जाणे – यात्रा करणे असा मर्यादित अर्थ घेतला जातो, तो योग्य आहे काय ?

4)धर्माची चिरंजीव लक्षणे कोणती ? धर्म व वाद (इझम) यांत भेद काय ? प्रार्थनापर धर्म आणि साधनापर धर्म म्हणजे काय ? धर्मप्रधान भारतीय जीवन म्हणजे काय ? (इतके विविध धर्म का निर्माण झाले ?)

5)मत, पंथ, संप्रदाय, रिलिजन यात साम्य व भेद कोणता ?

6)धर्म आणि तत्वज्ञान एकच काय ? वेगळे असतील तर त्यांचा परस्परसंबंध कोणत्या प्रकारचा असतो ?

7)हिंदू धर्माची अपरिवर्तनीय त्रिकालबाधित चिरस्थायी अशी तत्वे कोणती ? कालमान, परिस्थिती यांच्या अनुसार व्यवस्थेच्या व रचनेच्या स्वरुपामध्ये असलेली हिंदू़ धर्माची अंगे कोणती ?

8)कर्मविपाक, पुर्नजन्म, इश्वर मानणे हे हिंदु धर्माला आवश्यक आहे काय? हिंदूची व्याख्या व कसोटी कोणती ? सर्वांना समान आचार कोणता ? तो प्रथमपासून का नाही ?

9)हिंदू धर्माच्या तिन तत्वापैकी पुर्नजन्म व कर्म-विपाक ही अगदी स्वतंत्र आहेत काय?

10)हिंदु धर्म म्हणजे नेमके काय ? त्याचे पालन करण्याच्या किमान गोष्टी कोणत्या ?

11)हिंदू धर्म, हिंदू संस्कृती यांचे शिक्षण शैक्षणिक संस्थातुन दिले जावे असे अनेक जण म्हणतात त्याच्या किमान आराखडा काय असावा ?

12)कुटुंबात धार्मिक म्हणजे हिंदूत्वाचे वातावरण टिकविण्यासाठी किमान कोणते आचार – विचार पाळावेत व प्रौढ स्त्री-पुरुषांनी कोणत्या गोष्टी टाळाव्या ?

13)आजच्या काळात समाज-परिवर्तन म्हणजे काय ? विचार-आचार काय अभिप्रेत आहे ? लढाऊ समाज कसा उत्पन्न होईल ?

14)राजदंडापेक्षा धर्मदंड श्रेष्ठ असे हिंदू-तत्वज्ञान सांगते. ते आजच्याहि काळात योग्य व शक्य आहे काय?

15)हिंदू धर्मात नास्तिकालाही स्थान आहे हे योग्य आहे काय ? धर्मनिरपेक्ष राज्य हे हिंदू धर्माशी सुसंगत आहे काय ?

16)विश्वनियंत्राक म्हणून परमेश्वराला मानलेच पाहिजे काय ? नास्तिक असण्याने विश्वाच्या व्यापारात काय बदल होणार आहे?

17)समुद्रोल्लंघण निषिद्ध परधर्मात गेला की तो बाटला, तो पुन्हा हिंदूधर्मात येऊ शकत नाही असे हिंदू तत्वज्ञ सांगतात ते योग्य आहे काय ?

18)सामाजिक कर्तव्याची पालन करण्याची प्रवृत्ति धर्मशिक्षणातून कशी निर्माण करता येईल ? समाजसेवा हीच ईश्वरसेवा ही निष्ठा ख्रिस्ती मिशनऱ्यांत आढळते, तेवढी हिंदूत आढळत नाही. असे का ?

19)सामाजिक कार्य वा उत्सव व महोस्तव यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी त्यात सहभागी होणाऱ्या व्यक्तीने कसे वागावे ?

20)सर्वत्र समानता आणणे म्हणजे समाजवाद आणणे, याला हिदू तत्वज्ञानाचा विरोध आहे का ?

21)हिंदू धर्माची वैशिष्टे कोणती ? अन्य धर्माहून यांत वेगळेपण काय ? अन्य धर्माहून न्यूनता कोणती ? वा उठून दिसणारे दोष काणते ?

22)अन्य धर्म व हिंदू धर्म यांच्यातील फरकाचे नेमके मुद्दे कोणते ? हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व कशांत ? अन्य धर्मियांत अनेक सत्वशिल प्रामाणिक ध्येयनिष्ठ अशी माणसे आढळतातच ना !

23)कालगतीमुळे अथवा अन्य काही कारणांमुळे हिंदू समाजामध्ये कोणते दोष उत्पन्न झाले आहेत ? ते दूर करण्यासाठी काय व कसे प्रयत्न करावेत ?

24)आपल्या धर्मात वाईट असे काही आलेलेच नाही काय ?

25)तुमच्या एकूण विवेचनामध्ये सुधारकांविषयी व त्यांच्या विचारसरणीविषयी तुम्ही अत्यंत प्रतिकूल आहात असे जाणवते. ते योग्य आहे काय ?

26)हिंदू धर्मामध्ये फक्त ब्राह्मणास मांस वर्ज्य का ? मांसाने बुध्दीला अडथळा येतो असे म्हणावे तर मांसभक्षक युरोपियन जगज्जेते आहेत. वेदाचे याबाबत काय सांगणे आहे ? व्यवहारात कसे वागावे ?

27)सहस्त्रावधि वर्षांच्या प्रक्रियांमधून हेाणारे परिणाम सोसत आलेला आपला अलिकडचा हिंदू समाज ज्या स्वरुपात दिसतो आहे, त्या स्वरुपात त्याने पुरातन श्रेष्ठ संस्कृतीचा वारसा सांगावा यात वैशिष्ट्य कोणते ?

28)हिंदूत्वाच्या स्वरुपासंबंधी अनेक कल्पना मांडण्यात येतात. तुमच्या मते हिंदुत्वाचे अधिष्ठान कोणत्या स्वरुपाचे असले पाहिजे ?

29)हिंदू धर्म हा वैश्विक धर्म कसा हेाऊ शकेल ? कारण त्यातच एकसंघपणा नाही.

30)सर्व चांगली वैशिष्टे असताना भारताला भौतिक पराभव का पत्कारावा लागला ?

31)आमची संस्कृती ही भोगप्रधान नसून त्यागप्रधान आहे. याचा अर्थ भौतिक प्रगति आणि विज्ञानाने मिळणारी सुखे आम्हाला नको आहेत असा अभिप्रेत आहे काय ? आपल्या संस्कृतिचा भौतिक सुखाशी विरोध आहे काय?

32)संस्कृती व धर्म एकच का ? अंतर असल्यास कोणते ? संस्कति हा विचार व सभ्यता हा त्याचा प्रगट होणारा बाह्यचार हे म्हणणे योग्य आहे काय ? या दृष्टीने हिंदू संस्कृतिचे स्पष्टीकरण करता येईल का ?

33)अध्यात्म वा सांस्कृतिक कार्य म्हणजे मग तेथे नियम व्यवस्था शिस्त बंधने आवष्यक नाहीत. तर गबाळेपणा ढिलाई असणेच दूष्ट असे चित्र बरोबर आहे का?

34)श्रुतिस्मृतिवर अधारित असा हा आपला वैदिक धर्म आहे. पण स्मृतिकार अनेक असून त्यांनी कालानुरुप शास्त्रात, व्यवस्थेत बदल केले आहेत कां ? पुढेही हे हेाणे अभिप्रेत आहे का ? असे बदल शासनाने केले तर चालणार नाही का ?

35)“न राज्यं नैव राजाšसीत” अशी समाजरचना कधी होती का ? ती पुन्हां दृष्टिपंथात आणता येईल का ? या पद्धतीत व साम्यवाद्यांच्या शासनमुक्त समाजव्यवस्थेत (स्टेटलेस सोसायटीत) कोणते अंतर आहे ?

36)आपल्या दुरावस्थेला कारणीभुत झालेला असंघटितपणा कोणत्या कारणांनी उत्पन्न झाला ? ही कारणे नाहिशी करण्यासाठी काय करावे ?

37)भारताची अस्मिता जागवावयाची, परंपरा जतन करावयाची म्हणजे काय ? न पटणाऱ्या रुढी, खोटया समजुती याही पाळाव्यात काय ?

38)चांगले-वाईट, उपकारक-अपकारक हे मुळातच परिस्थितीसापेक्ष असल्याने व हिंदू समाजाला वेळोवेळी निरनिराळया परिस्थतीतून जावे लागले असल्याने सकृतदर्शनी तरी अनेक परस्पर विरुध्द गोष्टींचा अदभुत संग्रह त्याचे ठिकाणी झाला आहे. त्या सर्वांमधून आजच्या परिस्थितीला योग्य अशा गोष्टींची निवड कशी करावी ? त्यासाठी निकष वा मानदंड कोणता लावावा ?

39)कार्यक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक असणारी विविधता (व्दैत) जोपासूनहि भावनात्मक अव्दैत कशामुळे होऊ शकेल ?

40)जन्माने वर्ण नेमणे व त्यामुळे पारंपारिक धंद्यातच रहावे लागणे हे योग्य आहे का ? त्यामुळे उद्योग-स्वातंत्र्य हिरावले जात नाही का ? जातीय भेद, चातुर्वर्ण्य आजच्या काळात योग्य आहे का ? त्यात दोष किंवा विकृति नाहीत का ? अस्पृश्यता , जातीय भेद हे त्यामुळेच निर्माण झालेले आहेत. अशा स्थितीत चातुर्वर्ण्य स्वीकारावेत का ? समाज जीवनाचे नियम (तत्वे) अपरिवर्तनीय व रचना परिवर्तनीय हे कसे व कोण ठरवणार?

41)चातुर्वर्ण्य आज विसकळित झाले आहेत ते पुन्हा कसे प्रस्थापित करता येतील ?

42)वर्णव्यवस्था किंवा मनुस्मृती यांच्यावर आक्षेप का घेतला जातो ? अस्पृश्यता, उच्चनीचता व तज्जन्य वैषम्याची भावना असेपर्यंत हिंदू संघटन कसे शक्य आहे ?संघटनेसाठी आंतरजातीय विवाह प्रशस्त मानावेत का ?

43)विविधतेला शरीराच्या अवयवांची आणि भावनात्मक एकतेला आत्म्याची उपमा देऊन त्यांच्या संयोगाप्रमाणे हे साधावे असे सांगितले जाते. पण्ं शरीराचे अवयव विचारशक्ती,भावना,विकार या सर्वांपासून मुक्त आहेत. यांचे उलट प्रत्येक व्यक्तीजवळ विचार-भावना-विकार या गोष्टी असतात. तेव्हा शरीर आणि आत्म्याप्रमाणे एकता कशी साधता येणार?

44)आर्थिक अडचणींमुळे नवीन वैज्ञानिक सुधारणा,शिक्षण यांस जुन्या कल्पना तोंड कसे देणार?

45)दैववादाकडून प्रयत्नवादाकडे आपल्या समाजाचे परिवर्तन शिक्षणांतून वा धर्मशिक्षयातून कसे घडवून आणता येईल? (‘संभवामि युगे युगे याचा अर्थ सांगून अवाताराची वाट पाहत वसावे काय’)

46)निरनिराळया उपास्यदेवतमुळे समाज विघटित हेातो असे म्हणतात ते खरे आहे काय?

47)श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना आपण आदरणीय महापुरुष इतकेच नव्हे तर ईष्वरी अवतार मानतो. अशा स्थितीत त्यांच्या जीवनातील अनेक घटना या ईश्वरी अवताराला तर राहूद्याचा मानवाच्या मोठेपणालाहि न शोभणाऱ्या आहेत, असे आक्षेप अनेकांकडून घेतले जातात. त्यासंबंधी तुम्हास काय म्हणावयाचे आहे?

48)रामासारखे असावे आणि कृष्णासारखे वागावे असे का म्हटले जाते ? असणे-वागणे यांत फरक काय?

49)राधा ही प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हतीच असे म्हटले जाते ते खरे आहे काय? उदात्त प्रेमाची ती एक सांस्कृतीक कल्पना आहे असे म्हटले जाते त्यात कितपत तथ्य आहे ?

50)“कृण्वन्तो विश्वमार्यम ” ही घेषणा साम्राज्यशाहीची निदर्शक नाही का?

51)हिंदुस्थान हे एक राष्ट्र ही कल्पना इंग्रजांच्या आगमनानंतर निर्माण झाली असे म्हणतात. तुम्हाला काय वाटते ?

52)संख्यादोष , कुटुंबनियोजन इत्यादी उपस्थित होणाऱ्या निरनिराळया प्रश्नांना धर्मात कोठे उत्तरे आहेत?

53)‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति’ असे मनुस्मृती म्हणते हे खरे आहे का? आणि तसे असेल तर ते तसे का म्हटले ? यामुळे स्त्रियांना सदैव दास्यांतच राहावे लागते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत नाही. अर्थाजन कराता येत नाही. हे योग्य आहे काय?

54)मंदिर संस्थेचा उगम केव्हा व का झाला? मंदिरांची आजची दुरावस्था का दिसते?

55)वेदांमध्ये अश्लील म्हणता येईल अशा अर्थाचे काही मंत्र आहेत असे म्हणतात ते खरे आहे काय ? खरे असल्यास अशा मंत्राचे प्रयोजन काय ? वेदांसंबंधीच्या पवित्रतेच्या भावनेला त्यांने बाधा येणार नाही काय ?

56)धर्माची जागा साहित्याने घ्यावी असे साहित्यिकांनी म्हटले ते शक्य आहे काय? तसे झाल्यास त्याच्या परिणामाचा अंदाज आपण करु शकतो का?

57)इतिहास विकृत करुन आपल्याला शिकविला गेला आहे हे खरे आहे काय? असे का केले गेले ? इतिहासासंबंधी योग्य धारणा कोणती?

58)राजकारण, समाजकारण आणि धर्मकारण यांची संगति कशी लावावी ?

59)हल्ली शिक्षणाने माणसाची मने विशाल न होता स्वयंकेंद्रित झाली आहेत. समाजाला त्याचा उपयोग होण्याच्या दृष्टीने काय करायला पाहिजे?

60)अलीकडे विभूतिपूजेमुळे अयोग्य प्रथा वाढीस लागताहेत. गैरसमज निर्माण होऊन सामाजिक अडचणीहि वाढत आहेत. सामाजिक घटकांनी यासाठी काय करावे?

61)भारतीयवाद हा पूर्णवाद असून त्याचा दृष्टीकोन विश्वात्मवादी आहे म्हणजे काय?

62)मनुष्य नीतीचे नियम कालाच्या ओघात मोडतो ते खरे का? का इतर काही कारणे असतात ?

63)सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनात असलेली अशांतता व अस्थैर्य हे अध्यात्माव्दारे कसे घालविता येईल ?

64)सर्वांना सर्वांची जरुरी असते मग निस्पृह राहणे हे व्यवहारांत कसे बसेल?

65)अद्वेष्टा सर्वभूतांना… वैगरे व्यावहारिक सत्य वाटत नाही. असल्यास स्पष्ट करावे.

66)सर्वाभूती परमेश्वर पाहून व्यवहार करणे म्हणजे अव्यवहार्य गोष्टी पाहात बसणे नव्हे काय?

67)आजकाल सभोवार असे दिसते की नीतिनियम, सत्य, सदाचार वैगरे मूल्ये न पाळणाऱ्यांनाच विजय, श्रेष्ठत्व, लौकिक, सत्ता, संपत्ति प्राप्त होतात. अशा अवस्थेत नीतिमूल्यांच्या परिपालनांकडे सामान्य मनुष्य कसा आकर्षित व्हावा ? त्याची जिद्द कशी टिकावी ?

68)धार्मिक , संस्कृतिक विषयावर आज अपार वाड्यमय उपलब्ध आहे. कार्यकर्त्यांच्या बौध्दिक मार्गदर्शनासाठी काही निवडक ग्रंथ सांगू शकाल काय ?

69)देशाचे एैक्य आणि सामाजिक समरसता साधण्यासाठी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे काय ?

70)आमची संस्कृती कर्म करावयास सांगते व संन्यासही घ्यावा म्हणते, हे विसंगत नाही काय?

71)अध्यात्म म्हणजे केवळ मोक्षप्राप्ती हा अर्थ योग्य आहे का ? व्यक्तिपुढे केवळ हेच घ्येय ठेवले व त्यामुळे हिमालयात जाऊन साधना करावी लागेल असे हेाऊ लागले तर व्यक्ति ही साधना करावी लागेल असे होऊ लागले तर व्यक्ति ही सामाजजीवनाकडे पाठ फिरविणारी, सामाजिक दृष्टिकोन न ठेवता वागणारी होणार नाही का ? मग समाजजीवन म्हणून काही राहील का?

72)व्यक्तीच्या चारित्र्याकडे न पाहता त्याचे सामाजिक कार्य तेवढे लक्षात घ्यावे असे आज प्रतिपादले जाते ते ठिक आहे काय ?

73)फलासक्ति न ठेवता काम करीत राहाणे म्हणजे निरुद्देश , निर्हेतुक धडपड नव्हे काय ?

74)उपासना आणि अभ्यास यात काय अंतर आहे ? प्रत्येक व्यक्तीला उपासना आवष्यक आहे काय?

75)आनंद व दु:ख होते म्हणजे नेमके काय होते ? चोराचा आनंद व सज्जनाचा आनंद यामधे फरक काय ?

76)श्रध्दा आवश्यक आहे का ? डोळस – श्रध्दा व अंध श्रध्दा म्हणजे काय

77)तरुणपीढीचा परमार्थावर विश्वास बसण्यासाठी काय करावे ?

78)भजन- पूजन-यात्रा – दिंडी यांत मानवाचे उत्पादक कामाचे कित्येक तास वाया जातात ही समाजाची हानी धर्माच्यावरील श्रध्देने होते हे खरे नाही काय ?

79)गुरु मानावा या कल्पनेतून स्वामीभक्ती आली. पण यातूनच स्वामीभक्ती करतांना देशद्रोही पण घडलेला आपल्या देशात दिसतो तेव्हा त्या भक्तीची मर्यादा कोणती ?

80)यज्ञयागांना काही वैज्ञानिक अर्थ आहे काय ? त्यानिमित्ताने होणारी खाद्य पदार्थांची नासाडी भारतासारख्या दारिद्रयरेषेखालील लोकांची बहुसंख्या असलेल्या देशात यज्ञयागादि कृत्ये योग्य मानावीत काय ?

81)सुसंस्काराची जुनी व्याख्या बदलत्या काळानुसार बदलणे आवश्यक आहे काय ? कशी बदलावी ?

82)सुख-समाधान-शाति या कल्पना व्यक्तिसापेक्ष असतात तर त्यांच्या व्याख्या कशा करता येतील ?

83)यात्रेचे स्वरुप कसे असावे ? यात्रेतून काय साधावे?

84)आपल्या देशांत देवदेवतांच्या पुढे पशू बळी दिले जातात. मोठया मोठया यज्ञाच्या निमित्तानेही पशुहत्या होते असे म्हणतात. या हिंसेसंबंधी तुमचे मत काय आहे ?

85)सृष्टीचे आदिकारण नेमके काय ? इश्वर वा ब्रम्हतत्वास एकटेपणाचा कंटाळा आला असे कसे संभवते ? कारण ते तत्व तर निर्गुण निराकार आहे ना !

86)सृष्टीचा प्रलय झाल्यानंतर सर्व काही ब्रह्मरुप होऊन जाते तर ब्रह्मप्राप्तीसाठी वेगळी धडपड कशाकरिता ?

87)अद्वैताचा पुरस्कार करणाऱ्या संतांना ईश्वराचे अस्तित्व कसे पटले ?

88)“भावद्वैत सदा कुर्यात क्रियाव्दैत न कर्हिचित” हे उदारहरणाने कसे समजावे ?

89)देव आहे एैशी वाणी ! नाही पैसा मनी अनुभवावा !! यांच्या अर्थ काय ?

90)वारकरी आणि रामदासी संप्रदायात परस्पर-विरोधी भावना आहे असे आढळून येते ते योग्य आहे काय ?

91)विभूति, महापुरुष, युगपुरुष, अवतार , ईश्वर यांत काय फरक आहे ?

92)ध्येयवादी जीवनाला प्रतिज्ञाविधीची आवश्यकता आहे का?

93)आज ब्राह्मण म्हणजे भिक्षुक असे झाले आहे. ते योग्य आहे का? तो समाजाचे प्रबोधन करु शकेल का? शंकराचार्य हे करतात का ?

94)आपल्या देशात महागाई आणि भ्रष्टाचार सतत वाढतो आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन दु:सह होत आहे. याच्यामागे मनुष्यस्वभावातील दोष कारण आहे की अर्थशास्त्रातील काही चुकीच्या धारणा कारणीभूत आहेत?

95)श्राध्द आदि विधी का आले ?

96)आपल्या ग्रंथातील अदभूत गोष्टींचा घटनांचा वैज्ञानिक दृष्टिकोणातून अर्थ लावता येईल काय ?

97)वेदनिष्ठ, वेदप्रामाण्य मानणारी यज्ञप्रधान संस्कृति निर्मिणे आजच्या वैज्ञानिक जगात शक्य आहे का? विज्ञानाच्या कसोटीला हिंदू धर्म व संस्कृत टिकेल का?

98)सर्व काही पूर्वकर्मानुसार होते तर आपण आपले प्रारब्ध बदलू शकतो का?

99)प्रारब्ध व प्रयत्न यांचे व्यवहारात व परमार्थात स्थान कोणते?

100) मनुष्य म्हणजे केवळ शरीर नव्हे तर शरीर –मन-बुध्दि-आत्मा मिळून मनुष्य असे हिंदू तत्वज्ञान सांगते. पण शरीर लक्षात येते तसे इतरांचे नीट आकलन होत नाही. मग त्यांचे अस्तित्व का मनावयाचे ?

101) व्यक्तिीचा विकास व्यष्टी-समष्टी-सृष्टी-परमेष्ठी अशा टप्याने व्हावयाचा म्हणजे काय ? नराचा नारयण होणे म्हणजे ?

102) सगळे जगच जर मिथ्या आहे तर माणसाने चांगले होण्यासाठी खटपट का करावी ?

103) परोपकारादि सत्कृत्ये करणाऱ्या माणसांनी पूजापाठादि धार्मिक कृत्ये न केली तरी चालतील काय ?

104)अनेक प्रकारचे अन्याय होत असताना त्यांचा प्रतिकार कसा कराव ?

105)“आत्मानं सततं रक्षेत दारैारपि धनैरपि” हा उपदेश व्यवहारात आणण्याचा मार्ग कोणता ?